माननीय महापौर सौ. दीपमालाताई काळे यांना महाराष्ट्र सुवर्णकार सेना, जळगाव जिल्हा यांच्या वतीने जळगाव शहरातील मुख्य चौकाला संत श्री नरहरी महाराज यांचे नामकरण करून त्या ठिकाणी भव्य स्मारक उभारण्यात यावे, या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.जळगाव हे सुवर्णनगरी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत नरहरी महाराज यांच्या नावाने शहरातील प्रमुख चौकाचे नामकरण होऊन त्या ठिकाणी भव्य व आकर्षक स्मारक उभारण्यात यावे, अशी सर्व समाजाच्या वतीने मागणी करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवर: सौ. रंजनाताई वानखेडे (नगरसेविका),श्री संजय विसपुते (जिल्हाध्यक्ष),श्री विजय वानखेडे(उपाध्यक्ष),श्री संजय पगार (सचिव),श्री बापू रणधीर,श्री श्याम भामरे,श्री बबलू बाविस्कर,श्री इच्छाराम दाभाडे,श्री विनोद दंडगव्हाळ,श्री पंकज रणधीर,श्री दीपक जगदाळे,श्री राजेंद्र दुसाने,श्री पियुष वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.

